पश्चिम महाराष्ट्र

म्हणे पुरामुळे कर्नाटकात हानी झाल्यास "महाराष्ट्र' जबाबदार 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची आठवण काढणाऱ्या कर्नाटकला आता कृष्णा नदीतील पाण्याच्या विसर्गाचे वावडे वाटू लागले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून अतिरिक्त पाण्याच्या विसर्गाने जीवितहानी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरावे, अशी अजब मागणी कन्नड संघटनांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना निवेदनही पाठविले आहे. 

कन्नड संघटनांनी आज (ता. 2) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील विविध जलाशयांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाण्याचा विसर्ग वाढून कृष्णा काठावर धोका निर्माण होत आहे. भविष्यात अशी स्थिती कायम राहिल्यास 2005-06 वर्षी झाला तसा धोका निर्माण होऊ शकतो, असे कन्नड संघटनेने निवेदनामध्ये म्हटले आहे.

यासाठी यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कृष्णा काठावर धोका किंवा हानी झाल्यास त्याला महाराष्ट्र जबाबदार राहील, या आशयाचे पत्र महाराष्ट्राला पाठविण्याची मागणी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे केली आहे. 

उन्हाळ्यात तहान लागल्यानंतर महाराष्ट्राची कर्नाटकाला आठवण येते. आता महाराष्ट्र पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढून जलाशयांची पातळी वाढली आहे. महाराष्ट्रातील कोयना, राजापूर, वारणा आणि दूधगंगा जलाशयांचे पाणी कर्नाटकाला सोडले जात आहे. या पाण्याच्या विसर्गावरूनच कन्नड संघटनांकडून खडे फोडण्यास सुरुवात झाली आहे. 

अतिरिक्त पाण्यामुळे 2005-06 मध्ये मोठी हानी होऊन कृष्णा काठावरील जनतेने स्थलांतर केले होते. यावर्षी तशी स्थिती झाल्यास महाराष्ट्राला जबाबदार धरण्याची मागणी करण्यात आली आहे. मार्च महिन्यात ज्यावेळी पाण्याची गरज होती, त्यावेळी शिष्ठमंडळांकडून महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्राने पाणीही सोडले होते. 

अनाठायी मागणी 
आता मात्र महाराष्ट्रात पाणी पातळी वाढल्याने दरवर्षीप्रमाणे कर्नाटकात पाणी सोडले जात असल्याने त्याची दखल घेत कन्नड संघटनेकडून महाराष्ट्राला जबाबदार धरण्याची अनाठायी मागणी करण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT